
विद्यार्थ्यांचा घरातील पालकांशी संवाद होणे फार
आवश्यक आहे. आई, वडिल, भाऊ, बहिण आणि बालवाडीतले विद्यार्थी यांचा
एकमेकांशी संवाद होण्यासाठी शिक्षकांनी एक उपक्रम सुरु केला आहे. एका
‘चित्रकार्ड’ यावर कुठलीही गोष्ट पुस्तकरूपाने मांडणे, ती शिक्षक स्वत:
मुलांच्या घरी जाऊन पालकांच्या हातात देतात. वास्तविक मुलांमार्फत ही
क्रिया होऊ शकते, परंतू मुलांच्या हाताने ते खराब होईल किवा हरवू
शकत.चित्रकार्डच्या आधारे घरातील आई किंवा वडिलांनी विद्यार्थ्याला ती
गोष्ट सांगणे अपेक्षित असते. या उपक्रमामुळे ते बालकही बोलके होते,
चित्रामुळे ती गोष्ट विद्यार्थ्याला व्यवस्थित लक्षात राहते. आई – वडिल
अशिक्षित असल्यास मोठे भावंडे गोष्ट सांगू शकतात. उदा. ससा कासवाची गोष्ट,
तहानलेला कावळा, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, रामायण- महाभारत, पंचतंत्र
इत्यादी .
या उपक्रमामुळे घराती पालकांशी संवाद साधला जाऊन
त्यांचे नकळतपणे शिक्षणही चालू राहते. पालकांनी मुलांशी काय बोलावे हा
प्रश्नही उरत नाही. पालकही अनेक गोष्टी मुलांना सांगू शकतात आणि शिक्षकही
चित्रकार्डद्वारे अनेक गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू शकतात.
No comments:
Post a Comment