स्पर्धेला सामोरे जाताना (परीक्षा- रिझल्टमधील तीव्र स्पर्धा सांभाळण्यासाठी)

- वेळेचे योग्य नियोजन- सुरुवातीपासूनच अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास, परीक्षेनंतर ताण जाणवणार नाही.
- मानसिक स्वास्थ्य – बुद्धी ही गोष्ट आपल्या हातात नाही. पण परीक्षेत यश मिळविण्यासाठी कसून प्रयत्न करणे ही गोष्ट तुमच्या हातात आहे. त्यात कमी पडू नका.
- सकारात्मक विचार- अपयश आले तर काय या विचाराने खचून जाऊ नका. अपयश का आले याच्यापेक्षा ते अपयश यशात कसे बदलता येईल याचा विचार करा.
- अपेक्षा लादू नका – परीक्षा, रिझल्टची तीव्र स्पर्धा समजून घेऊन, पालकांनीही आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. पालकांनी त्यांना आधार द्यायला हवा. मुलांच्या मेहनतीचे, त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करायला हवे. आपल्या मुलांची कुवत ओळखून मुलांकडून अपेक्षा ठेवली पाहिजे हे लक्षात ठेवा. आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांबरोबर करणे टाळाच.
एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी श्वसनाचे साधे व्यायाम, ध्यान धारणा उपयोगी पडते. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मननिकोप बनतं.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांप्रमाणे इतर प्रवेश परीक्षांना आता सुरुवात होईल. एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या विविध परीक्षांवर अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असल्याने ताण हा असणारच. या ताण टाळण्यासाठी सुरुवातीपासून अभ्यासाची तयारी करणंच उत्तम.
No comments:
Post a Comment