Monday, 17 November 2014

कृषि विकास

कृषी विकास
-राजू ठोकळ

कुठून केव्हा येतील
अच्छे दिन
वाट पाहून रोज
शेतकरी झाला दीन

माझा बाप
एकटा नाही
असंतोषाच्या आगीत
रोज जळते लोकशाही

दुबळ्या विकासाच्या गप्पांत
काळीज माझं फाटतं
शेतीमालाच्या संकटांत
नशीब मेलं फुटकं

गरीबी-जुलुमाचे
राजकारण कळु लागले
मान-सन्मानाचे
बळीचं राज्य जळु लागले

झेंडे आणि तोंडं
सत्तेत सारेच बदलले
विकासाच्या अजेंड्यात
शेतक-याला मात्र विसरले

आत्महत्त्येच्या विचाराने
हैराण सारी माती
लाखो हातांच्या एल्गाराची
कुठे हरवली नीति?

निसर्गाच्या लहरीपणागत
सरकारी योजनांचा खेळ सारा
माय-बापाच्या अस्तित्वासाठी
चला देवू कृषि विकासाचा नारा

©www.rajuthokal.com

"शेतकरी जगला तर देश टिकेल"

राजू ठोकळ

facebook

No comments:

Post a Comment