Friday, 19 December 2014

टाळले सा-यांनी

टाळले सा-यांनी....

टाळले सा-यांनी सदा
तरी आर्ततेने सांगणे माझे
जाळले पुतळे आमचे
अस्तित्वाचे गा-हाणे माझे

आरक्षणाच्या लढ्यात
झाकाळले जगणे माझे
उद्याच्या पीढ़ीचे भविष्य
हक्कांसाठी भांडणे माझे

मोडला अनेकदा डाव
घटनेशी बोलणे माझे
हरवला आमचा न्याय
समाजासाठी लढ़णे माझे

सुर्याचा अस्त अचानक
विचारांचा दिवा पेटविणे माझे
घुसखोरविरोधी लढ्यात उतरा
श्वासागणिक विनविणे माझे

वास्तवाचे भान जाणत्यांना
तरी नासविले जीवन गाणे माझे
हत्यारांची मर्यादा लढ्याला
तरी तो उम्बरा ओलांडणे माझे

कधी न केला काही गुन्हा
तरी सजा भोगणे माझे
सत्याची कास संस्कृतीला
आज वादळाशी झुंजणे माझे

-राजू ठोकळ
www.rajuthokal.com

Tuesday, 16 December 2014

माझा अभिमान...

माझा अभिमान....

आमची कला
आमचा अभिमान
आमची जमिन
आमचा स्वाभिमान

आमची संस्कृती
आमचा अभिमान
आमची प्रकृती
आमचा स्वाभिमान

आमची बोली
आमचा अभिमान
आमची झोपड़ी
आमचा स्वाभिमान

आमची माणसं
आमचा अभिमान
आमची कणसं
आमचा स्वाभिमान

आमचा निसर्ग
आमचा अभिमान
आमचा धर्म
आमचा स्वाभिमान

आमचा मूलनिवासी
आमचा अभिमान
आमचा आदिवासी
आमचा स्वाभिमान

Lets do it together.

www.jago.adiyuva.in

Sunday, 14 December 2014

कुपोषण...

कुपोषण....

दोन वेळच्या पोटाचा
प्रश्न सदैव उभा राही
फळे-कंदमुळेही
कुपोषणाला उत्तर नाही

हिसकावले वैभव सारे
योजनांचे गर्भित इशारे
वनजमिनी हक्कहि
धुळिस मिळाले सारे

आदिवासी विकास
कोण्या विभागाने भोगले
योजनांच्या कागदावर
अधिकारी बेणे जगले

कुत्सित वास्तवात
सिक्षान आज नासले
हजारो पिढ्यान्चे
लोणी भडव्यांनी लाटले

कोवळ्या फुलांना
यांना मजूर बनवायचे
समारंभात हरामखोरान्च्या
उघडे नागडे नाचवायचे

मंत्री महोदय आमचे
खुर्चिच्या लालसेत भड़वे
पक्षाच्या आदेशावर
वाट्टेल तसे नाचती गाढवे

शिपाई-कारकुन
हीच ती काय कमाई
शिक्षक अन इतर साले
कसले सरकारचे जावई

कुठे कुठे नाही
समाजाची कुस जपलेली
शहरात गेलेली कुत्री
झालीत मोकाट माजलेली

ऊंची ऐशो आरामात
डोळे असून आन्धळे सारे
पाशवी अन्यायाच्या बातम्यांत
आदिवासींना समजती बिचारे

पै पैच्या हिशोबाचे
झाले सर्व उत्तराधिकारी
निसर्गाच्या पूजा-याची
कोणी घेईना जबाबदारी

निरास मनाचा टाहो
स्वकियांच्या हरामीपणाशी भांडतो
लुटेरे तर नित्याचेच
पण आमच्याच तत्त्वान्ना  छेडतो

कला, बोली, संस्कृती
वाटतात विचार कमीपणाचे
आरक्षणाच्या फायद्यात हेच
सर्वात पुढे बाराबोड्याचे

कायद्याच्या तराजुत
आमचे वजन पडत नाही
न्यायाच्या लढाईत
नक्षलवाद कधी जिंकत नाही

उलगुलानच्या ना-याला
तो मनातला बिरसा जागवा
मूलनिवासी धर्माला
आपल्या मनात जगवा

चार अक्षरांची
झाली कुठे आता ओळख
देवू जोमाचा आम्ही लढा
भेदु कुपोषणाचा काळोख

-विद्रोही आदिवासी

Wednesday, 10 December 2014

शहीद वीर नारायण सिंह

"शहीद वीरनारायण सिंह"

शत-शत प्रणाम
महानदी की घाटी और छत्तीसगढ़ की माटी के महान सपूत वीर नारायण सिंह को 10 दिसम्बर 1857 को रायपुर के चौराहे वर्तमान में जयस्तम्भ चौक पर बांध कर फाँसी दी गई बाद में उनके शव को तोप से उड़ा दिया गया..
"आदिवासियों के शेर कहे जाने वाले अमर शहीद वीरनारायण सिंह को राज्य के प्रथम स्वतन्त्रता सेनानी का दर्जा प्राप्त है.....देश की आजादी के लिए अपनी जाने देने वाले शहीद वीर नारायण सिंह जमींदार परिवार में जन्मे थे, चाहते तो अंग्रेजों के राज में भी आराम की जिंदगी जी सकते थे लेकिन उन्होंने आजादी को चुना और अंग्रेजों से बगावत कर दी। उनकी शहादत स्थल पर जय स्तंभ नाम का स्मारक बनवाया गया जो सालों से शहर की विभिन्न गतिविधियों का केंद्र बना हुआ है।
कौन थे शहीद वीर नारायण सिंह?
वीर नारायण सिंह का जन्म सन् 1795 में सोनाखान के जमींदार रामसाय के घ्रर हुआ। उनके पिता ने 1818-19 के दौरान अंग्रेजों तथा भोंसले के विरुद्ध तलवार उठाई लेकिन कैप्टन मैक्सन ने विद्रोह को दबा दिया । इसके बाद भी बिंझवार आदिवासियों के सामर्थ्य और संगठित शक्ति के कारण जमींदार रामसाय का उनके क्षेत्र में दबदबा बना रहा और अंग्रेजों ने उनसे संधि कर ली।
अंग्रेजों की नीतियों के खिलाफ उठाई आवाज
वीर नारायण सिंह पिता की निडरता और देशभक्ति देखते हुए बड़े हुए। पिता की मृत्यु के बाद 1830 में वे जमींदार बने। स्वभाव से परोपकारी, न्यायप्रिय तथा कर्मठ वीर नारायण जल्द ही लोगों के प्रिय जननायक बन गए। 1854 में अंग्रेजों ने नए ढंग से टकोली लागू की जिसके विरोध में आवाज उठाने के कारण रायपुर के तात्कालीन डिप्टी कमिश्नर इलियट उनके घोर विरोधी हो गए ।
व्यापारी का अनाज गरीबों में बंटवा दिया
1856 में छत्तीसगढ़ में सूखा पड़ गया, अकाल और अंग्रेजों द्वारा लागू किए कानून के कारण प्रांत वासी भुखमरी का शिकार होने लगे, लेकिन कसडोल के व्यापारी माखन का गोदाम अन्न से भरा था। वीर नारायण ने उससे अनाज गरीबों में बांटने को कहा लेकिन वह तैयार नहीं हुआ। इसके बाद उन्होंने माखन के गोदाम के ताले तुड़वा दिए और अनाज निकाल ग्रामीणों में बंटवा दिया। उनके इस कदम से नाराज ब्रिटिश शासन ने उन्हें 24 अक्टूबर 1856 में संबलपुर से गिरफ्तार कर रायपुर की जेल में बंद कर दिया। 1857 में जब स्वतंत्रता की लड़ाई तेज हुई तो प्रांत के लोगों ने जेल में बंद वीर नारायण को ही अपना नेता मान लिया और समर में शामिल हो गए। उन्होंने अंग्रेजों के बढ़ते अत्याचारों के खिलाफ बगावत करने की ठान ली थी।
जेल से भाग अंग्रेजों से लिया लोहा, फिर सरेंडर कर दिया
अगस्त 1857 में कुछ सैनिकों और समर्थकों की मदद से वीर नारायण जेल से भाग निकले और अपने गांव सोनाखान पहुंचे। वहां करीब 500 बंदूकधारियों की सेना बना कर अंग्रेजी सैनिकों से मुठभेड़ की। इस बगावत से बौखलाई अंग्रेज सरकार ने जनता पर अत्याचार बढ़ा दिए। अपने लोगों को बचाने के लिए उन्होंने समर्पण कर दिया जिसके बाद उन्हें मौत की सजा सुनाई गई। 10 दिसंबर 1857 को ब्रिटिश सरकार ने उन्हें सरेआम खुले में पेड़ पर फाँसी में लटका दिया।
पोस्टल स्टाम्प नारायण सिंह के नाम
शहीद वीर नारायण सिंह को श्रद्धांजलि देने के लिए उनकी 130वीं बरसी पर 1987 में सरकार द्वारा 60 पैसे का स्टाम्प जारी किया गया, जिसमें नारायण को तोप के आगे बंधा दिखाया गया।GONDWANA STUDENT UNION इस स्टाम्प का विरोध करती हैं,क्योंकि ये सर्वविदित हैं कि गोंडवाना के शेर वीर नारायण सोनाखान को जनता के बीच दहशत फैलाने के उद्देश्य से खुलेआम पेड़ पर फाँसी दिया गया था।

GONDWANA STUDENT UNION की अपील:-साथियों ये सर्वविदित हैं कि गोंडवाना के शेर वीर नारायण सिंह को,जनता में उनके आगाध प्रेम और समर्पण को समाप्त करने तथा दहशत फैलाने के उद्देश्य से सरेआम खुले में पेड़ पर फाँसी दिया गया था।10 दिन तक उनकी लाश पेड़ पर लटकती रही,चील और कौवों ने उनके मांस को नोच-नोच कर खाया था।बलिदान की ऐसी मिसाल भारत में कहीं नहीं मिल सकती हैं,लेकिन कलम के सौदागरों ने इस बात को महत्व नहीं दिया।आप लोगों को मालूम ही होगा कि सरकार भी पहले 19 दिसंबर को वीर नारायण सिंह की पुण्यतिथि मनाती रही हैं मगर इस वर्ष ये 10 दिसंबर को ही मना रही हैं,इसके पीछे की राजनीति को समझिए और अन्य लोगों को समझाइए। GSU परिवार की अपील हैं आप सभी लोगों से कि आप लोग गोंडवाना के लाल वीर नारायण सिंह सोनाखान का बलिदान दिवस 10 दिसंबर से 19 दिसंबर तक शहीद सप्ताह के रूप में 10 दिनों तक मनाएँ और अपने आसपास के लोगों को शहीद वीर नारायण सिंह सोनाखान के बारे में बताएँ तथा हो सके तो अपने अपने फेसबुक प्रोफाइल में वीर नारायण सिंह का वाल लगाएँ।

-संकलित

Monday, 8 December 2014

मदतीच्या नावाने राजकारण

News for ref...

Dec 06, 2014
अतुल देऊळगावकर

कॉपरेरेट कंपन्या आपल्या नफ्यातील दोन टक्के वाटा समाजकार्यासाठी खर्च करत असल्या तरी तो दिखाऊ प्रकार असतो. प्रत्यक्षात त्यांची सामाजिक जबाबदारी हा वदतोव्याघात असल्याचीच प्रचीती येते.
सत्तेच्या वर्तुळातील कोणाच्याही विरोधातील बंड मोडून काढण्यासाठी, येनकेनप्रकारेण त्या भूमीत शिरकाव करून बळाच्या जोरावर पाय पसरवण्याच्या प्रक्रियेला युद्धतंत्रात ‘क्लीअर, होल्ड, बिल्ड’ असं म्हणतात. बंड व क्रांती, फुटीरतावादी व क्रांतिकारक या संज्ञा आणि त्यामुळे नीती व न्याय संकल्पना सापेक्षच असतात. पडद्यामागून (कधी थेट रंगमंचावर अवतरून) सत्ता राबवणारे ‘उद्योग’ आगेकूच करण्यासाठी ‘क्लीअर, होल्ड, बिल्ड’ हेच डावपेच वापरत आहेत. ‘ते’ विकासाभिमुख व आधुनिक, तर त्यांना विरोध करणारे मागास अथवा नकारात्मक ठरतात. ‘ते’ ठरवतील तो मोबदला, करतील तो विकास, म्हणतील ते समाजकार्य ठरवले जाते. मानवता, मानवी हक्क, मूल्ये, पर्यावरण यांसारख्या ‘क्षुल्लक बाबींना’ न जुमानता विकासाचा अश्वमेध चौखूर उधळणाऱ्या उद्योगांची संख्या व व्याप्ती वाढत आहे. याच काळात वार्षकि उलाढालीचा काही वाटा सामाजिक कार्यात खर्ची घातल्याचा देखावा ते निर्माण करीत आहेत. वास्तविक, समाजाशी त्यांना काहीही देणंघेणं नाही. ताळेबंद आणि नफ्याशिवाय त्यांची कशालाच बांधीलकी नाही. माणूस व निसर्गाला क:पदार्थ मानणाऱ्या उद्योगांची सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) हा वदतोव्याघात असल्याची प्रचीती वारंवार येत आहे. सुदीप चक्रवर्ती यांनी देशभर िहडून व अनेकांच्या भेटींचे वृत्तांकन व विश्लेषण ‘क्लीअर, होल्ड, बिल्ड - हार्ड लेसन्स ऑफ बिझनेस अ‍ॅण्ड ह्युमन राइट्स इन इंडिया’ या पुस्तकात सादर केलं आहे.
पाषाण व लोहयुगापासून सिव्हिलायझेशनचे अवशेष जतन करणारा ओदिशामधील कलाहांडी जिल्हा काळाच्या ओघात कायमस्वरूपी दुष्काळाचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध झाला. त्या भागातील खनिज संपन्नतेची चाहूल लागताच ‘वेदांत अ‍ॅल्युमिनियम लिमिटेड’ हा बलाढय़ उद्योग तिकडे दाखल झाला. बॉक्साइटचे उत्खनन करण्यासाठी त्यांना वन जमिनीची गरज होती. कुठलीही परवानगी मिळण्याआधीच वेदांत उद्योगाने खोदकाम चालू केलं. निलगिरीचं समृद्ध जंगल नष्ट होणार हे पाहून त्या भागात शतकानुशतकं राहणारे कोंढ आदिवासी हादरून गेले. तीन पिढय़ांपासून जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी जमातींचा तिथे जमीन कसण्याचा अधिकार भारतीय वन कायद्यानं दिला आहे. दोनशे गावांतील आठ हजार आदिवासींना स्थलांतराची टांगलेली तलवार स्पष्ट दिसू लागली. समस्त आदिवासी प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले. देशभरातील प्रसारमाध्यमांनी त्याला ठळक प्रसिद्धी दिली. ओसरीची परवानगी घेऊन हळूहळू पाय पसरवण्यासाठी दाम व भेद अथवा पोलिसी दंड वापरण्याचं उद्योगी कौशल्य अफलातून असतं.
देशातील अमाप खनिज साठय़ांची जाणीव झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये कॉर्पोरेट स्पर्धा सुरू झाली आहे. ‘‘छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, आंध्र, ओदिशा असो वा महाराष्ट्र सर्व राज्यांतील देशी व विदेशी उद्योगांची कार्यप्रणाली सारखीच होती. जमीन बळकावण्याकरिता वाटेल ते, हे त्यांचं ब्रीद. ते म्हणतील तो न्याय्य मोबदला ठरतो,’’ असं चक्रवर्ती म्हणतात.
‘‘सारं काही सुरळीत चालू असताना अनपेक्षितपणे उच्चाटन, कसदार जमिनीची नासाडी, हवा व पाण्याचं प्रदूषण, स्थलांतराच्या यातना सहन करण्याची पाळी येणाऱ्या बहुसंख्य स्थानिकांचा असंतोष वाढीला लागत आहे. त्यातून ते संघटित होतात. पोलीस सोयीस्कररीत्या त्यांच्यावर नक्षलवादी असल्याचा शिक्का मारतात. तर चोहीकडून कोंडी झालेले कित्येक तरुण नक्षलवादी मार्गाला जातात. उद्योग सहमतीचे करार (एम. आय. यू. इझम) व माओवाद (माओइझम) एकाच वेळी वाढत आहेत,’’ असं लेखकांचं निरीक्षण आहे. भारतातील खनिज, जंगल व जल या सर्वागांनी निसर्गसंपन्न भागातच भीषण दारिद्रय़ नांदत आहे. ‘फोर्ब्स’च्या यादीमधील अब्जोपती आणि कुपोषित यांची संख्या एकाच वेळी वाढत आहे. अब्जावधींचे फायदे करणारे उद्योग आणि मानव विकासाच्या सर्व निकषांवरील ठणठणाट एकाच ठिकाणी वसत आहे.
एकंदरीत मोक्यावर जागा असणं (वा जाणं), गावात खनिज असणं, धोकादायक झालं आहे. शासनपुरस्कृत उद्योगपतींचं भूग्रहण अभियान राजरोस चालू आहे. शेतजमिनीच्या भरपाईवरून उद्योग व शेतकऱ्यांमध्ये सहज व सुरळीत व्यवहार कुठेही होत नाही. मग जमीन संपादनाकरिता उद्योगांचं पालकत्व घेऊन राज्य सरकारच उतरतं. प्रकल्पास लागणाऱ्या जागेच्या परिसरात जंगल व आदिवासी अजिबात नसल्याची ग्वाही बिनदिक्कत देतं. पोलीस यंत्रणा विरोध करणाऱ्यांवर वाटेल ते गुन्हे लावून दहशत निर्माण करतं. जमीन जाणारच असल्याची खात्री पटल्यावर अधिकाधिक मोबदला मिळवण्याकरिता वाटाघाटी चालू होतात. कधी चर्चा फिसकटून विरोधाला िहसक वळण लागतं. सुसंस्कृततेकरिता ख्यातकीर्त असलेल्या ‘टाटा’ समूहालासुद्धा किलग व सिंगूरमध्ये जमीन मिळवण्यासाठी याच रस्त्यांनी जावं लागलं. ‘टाटा’नी स्थलांतरितांना नंदनवनाचं आश्वासन दिलं होतं. प्रत्यक्षात झोपडपट्टीत चाललेली त्यांची परवड चक्रवर्तीनी दाखवून दिली आहे. जमीन ताब्यात येण्याआधी व नंतर होणारा भाषेतील बदल यातून अनेक उद्योगांची लबाडी ते दाखवून देतात. विविध राज्यांमधील जागतिक गुंतवणूक परिषदांना उद्योगपतींचा प्रतिसाद भरभरून असतो. (परंतु मानवी हक्कांसाठी घेतलेल्या परिषदेकडे वरिष्ठ अधिकारीसुद्धा फिरकत नाहीत.) उद्योगपतींची व सत्ताधाऱ्यांची भाषणे, प्रशासनाचा आव, हे सारं काही लेखकांनी सूक्ष्मपणे टिपलं आहे. त्यातून देशातील अर्थराजकारण उघड होतं.
कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या नफ्यामधील दोन टक्के वाटा सामाजिक कामाकरिता द्यावा, असं बंधन आल्यापासून प्रदर्शनी कार्यक्रमांना ऊत आला आहे. बेसुमार पाणी उपसा, दुसरीकडे कारखान्यांच्या सांडपाण्याने जलस्रोत नासवून टाकणारे उद्योग पावसाच्या पाण्याची साठवणुकीची जाहिरात करतात. विषारी प्रदूषणामुळे सभोवतालच्या गावांचं जगणं अशक्य करण्याची भरपाई एखादी शाळा बांधण्यानं वा काही शिष्यवृत्त्या देऊन होईल का ? ‘आमच्या कन्या, आमचा अभिमान’ अशा घोषणा करणाऱ्या नखरेल अभिनेत्री, बाहुबलीछाप अभिनेते हे कंपन्यांच्या बाजारपेठेसाठी राजदूत होतात. दूरचित्रवाणी वाहिन्या त्यांच्या भागीदार होतात. अशा खटाटोपानं अमानवी कृत्ये झाकली जातील, असे मूलभूत प्रश्न लेखक उपस्थित करतात.
कित्येक वेळा एका उद्योगाविरोधातील संघर्षांला स्पर्धक उद्योगाची साथ लाभते. मानवी हक्कांचा हत्यारासारखा वापर करणारे प्रसंग अनेक वेळा घडतात. ही बाजूसुद्धा लेखकाने मांडावयास हवी होती. बाकी इतरांकडे पाहण्याची तटस्थता, आत्मप्रेमामुळे लेखक विषयावरील पकड गमावून बसतात. पानोपानी डोकावणारा ‘मी’ व त्यानिमित्ताने ‘कुठे व काय खाल्लं’ छापाचा अनावश्यक विस्तार त्रासदायक होतो.
लंडन येथील इन्स्टिटय़ूट फॉर ह्युमन राइट्स अ‍ॅण्ड बिझनेस या संस्थेने, ‘‘विकसनशील देशांमधील उद्योगांकडून मानवी हक्कांच्या बाबतीत होत असलेली बेपर्वाई घातक आहे,’’ असं सांगत संघर्ष टाळण्याचे उपाय सुचवले आहेत. विकासामध्ये स्थानिकांना सहभागी करून घेणाऱ्या उद्योगांची उदाहरणे सांगितली आहेत. सरकारशी संगनमतानं स्थानिकांना वाऱ्यावर सोडत विकास साधणं फार काळ शक्य नाही, हे उद्योगांनी लक्षात घेणं का आवश्यक आहे? सरकार व समाज यांच्यामध्ये होणाऱ्या संघर्षांची कारणं काय आहेत? समंजस वातावरण करण्यासाठीची खबरदारी कशी घेता येईल? समाजाविषयी उदार दृष्टिकोन घेणं हेच उद्योगांकरिता दीर्घकालीन फायद्याचे कसे आहे, याचा सखोल ऊहापोह करणारे हे पुस्तक वाचलंच पाहिजे. www.jago.adiyuva.in

Saturday, 6 December 2014

आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध


दिवंगत आदिवासी कवी भुजंग मेश्राम यांच्या समग्र साहित्याचा समावेश असलेले 'आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध' हे पुस्तक आहे. आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक प्रश्नांची मार्मिक मांडणी करणाऱ्या या पुस्तकाला प्रसिद्ध कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे, या प्रस्तावनेतील काही अंश...
.....

भुजंग मेश्राम यांच्या 'आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध' या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. पहिला विभाग भुजंग मेश्राम यांची आदिवासी साहित्य संमेलनातील भाषणे, आदिवासी साहित्यासंबंधीचे लेख यांचा आहे. दुसरा भाग दलित साहित्यविचार असा आहे. भुजंग मेश्राम यांनी दलित साहित्य आणि आदिवासी साहित्य यांतील आंतरसंबंधांबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका घेऊन लिहिलेले असल्याचे आपल्याला दिसून येते. तिसरा भाग गोंडी भाषाविचार असा आहे. पहिल्या भागात मांडलेल्या वैचारिक भूमिकेचे एक प्रकारे उपयोजन आपल्याला येथे आढळून येईल. परिशिष्टामध्ये त्यांच्या मूळ गोंडी कवितांचा मराठी भाषांतरांसह अंतर्भाव केलेला आहे. सोबतच त्यांनी केलेले काही रेड इंडियन कवींच्या कवितांचे अनुवादही दिलेले आहेत. या विभागांतून भुजंग मेश्रामांची वैचारिक जडणघडण व त्यांच्या विचारचक्राची दिशा आपल्याला स्पष्टपणे दिसून येतेच. यासोबतच आदिवासी साहित्य आणि आदिवासींचे जीवन या बाबतीत असलेल्या त्यांच्या आस्थेच्या तीव्रतेचा अंदाजही वाचकांना येऊ शकतो.

'आदिवासी कविता' या शीर्षकाने भुजंग मेश्राम यांनी त्यांचा गोंडी भाषेतील कवितांचा छोटेखानी संग्रह, ते विद्यार्थीदशेत असताना साधारणत: १९७९ साली प्रकाशित केला होता हे फारच थोडया लोकांना माहिती आहे. या संग्रहातील कविता त्यांच्या मराठी कवितांच्या वाचकांनी पाहिल्या असण्याचीही शक्यता कमीच आहे. पुढे विस्तार पावलेल्या त्यांच्या कवितेच्या एकूण व्याक्तिंमत्त्वाची बीजे आपल्याला या संग्रहात ठळकपणे दिसून येतात.

भुजंग मेश्राम यांच्या 'ऊलगुलान' या संग्रहात गोंडी, परधानी, गोरमाटी कविता व त्यांनी स्वत: केलेले त्यांचे अनुवाद आहेत. त्यानंतरच्या 'अभुजमाड' या संग्रहातदेखील कोकणी मोमिनी, वऱ्हाडी, बंबइया बोलीतील कविता आहेत. त्यांची कविता बोलीभाषेतून लोकजीवनाचा अर्क आपल्यात मुरवून घेत भाषिकदृष्टया संपन्न होत होती.

'आदिवासी कविता' या संग्रहातील गोंडी भाषेतील कवितांचा मराठी अनुवाद करण्याचे अवघड काम गडचिरोलीचे तरुण कवी राजेश मडावी यांनी आनंदाने स्वीकारले. या कामी भुजंग मेश्राम यांचे निकटचे मित्र कवी प्रभू राजगडकर यांची मदत झाली. या पुस्तकाच्या निमित्ताने 'आदिवासी कविता' या संग्रहाचा मराठी अनुवाद झाल्याने आता भुजंग मेश्राम यांचे संपूर्ण कविता लेखन मराठीत उपलब्ध झालेले आहे. भुजंग मेश्रामांची कविता ही मराठी कवितेच्या मध्यप्रवाहातली महत्त्वाची कविता आहे. खरेतर आपण या कवितेची पुरेशी नीट दखल घेण्यात कमी पडत आहोत. चांगल्या कवितेची सगळी भाषिक, भावनिक आणि बौध्दिक लक्षणे सामाजिक बिंबासह या कवितेत आहेत. सदरहू गोंडी कवितांचे अनुवाद वाचताना ही कविता उगमापाशीदेखील एक सशक्त कविताच होती हे आपल्याला प्रकर्षाने जाणवेल.
...

भुजंग मेश्राम यांचे हे वैचारिक गद्यलेखन अनन्यसाधारण आहे. त्यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातल्या एका छोटयाशा आदिवासी पाडयात झाला. आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षण, नांदेडला महाविद्यालयीन शिक्षण आणि पुढील शिक्षण व नोकरी मुंबई या महानगरात झाली. यांचा मुद्दाम उल्लेख याकरता करतो आहे कारण त्यातून भुजंग मेश्राम यांच्या अनुभवविश्वाचा व्यापक आवाका लक्षात यावा. त्यांच्या 'ऊलगुलान' व 'अभुजमाड' या दोन्ही कवितासंग्रहांमधून त्यांच्या अनुभवविश्वाचे व वैचारिक आवाक्याचे दर्शन घडतेच. प्रस्तुत ग्रंथातील लेखांमधून या कवितांमागील कवीची मनोभूमी कशाप्रकारे तयार झाली होती हे दिसून येते.

भुजंग मेश्रामांच्या व्याक्तिंमत्त्वात एक अस्सल आदिम आदिवासीपण होते. त्यात एक संशोधकदेखील दडलेला होता; जो आपले कार्य सतत करत होता. त्यांच्यातल्या या संशोधकामुळे त्यांचे वाचन चौफेर झाले होते. प्रस्तुत पुस्तकातील अनेक लेखांमधून आपल्याला अनेक भारतीय भाषांमधलेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय साहित्यातलेदेखील संदर्भ समर्पकपणे आलेले दिसून येतात. त्यांच्या संशोधन वृत्तीमागच्या प्रेरणा दोन प्रकारच्या होत्या. एक तर त्यांना स्वत:ची मुळे शोधायची प्रचंड ओढ होती. त्याकरता त्यांनी जगभरातल्या आदिवासी साहित्याचा आणि आदिवासीविषयक लेखनाचा संग्रह केला होता. त्यांचे वाचन, प्रसंगी अनुवादही करणे सतत सुरू होते. या आत्मशोधाच्या प्रेरणेशिवाय दुसरी प्रेरणा म्हणजे त्यांना आदिवासी समाजाबद्दल, त्यांच्या आपल्या समाजातील माणसांबद्दल अपार करुणा आणि प्रेम होते.

जागतिकीकरणाच्या रेटयामधे बोलीभाषां-सोबतच प्रमाण भाषांचीही काय दुरवस्था झाली आहे याची पूर्ण कल्पना भुजंग मेश्राम यांना होती. दिवसेंदिवस जगातल्या आदिवासींची संख्या घटते आहे, त्यांच्यातले अनेक समूह त्यांच्या भाषांसकट, त्यांच्या संस्कृतीसकट अक्षरश: लुप्त होत आहेत, डोळयासमोर एक एक बोलीभाषा मृतवत होत आहे, या भीषण परिस्थितीची त्यांना पूर्ण जाणीव होती. आपल्या समग्र लेखनातून ते या भयावह परिस्थितीशी लढत होते.
...

आदिवासी साहित्याबाबत प्रतिपादन करताना अनेक मूलभूत महत्त्वाचे मुद्दे भुजंग मेश्राम यांनी उपस्थित केले आहेत. आदिवासी हे मानवी अवस्थेचे प्रतीकात्मक वर्णन असताना आपण ते शोषित या अर्थाने वापरतो असा आक्षेप ते आदिवासी या शब्दाच्या रूढ वापराबाबत घेतात. सोबतच आदिवासी हे मागासलेले हिंदू नव्हेत असे स्पष्ट विधान ते करतात. आदिवासींची मुळं शोधण्याच्या त्यांच्या प्रवासाच्या अनुभवांवर आधारित प्रतिपादन करताना ते म्हणतात की 'आम्ही इतिहासात कुठेही नाही'. आदिवासींचा इतिहास कुणी लिहिला नाही. एवढेच नव्हे तर जगभरात आदिवासींच्या सृजनकथा ज्या मौखिक परंपरेतून कथन केल्या जातात त्यांना अभिजात साहित्याचा दर्जा देण्याची उदारतादेखील प्रमाण भाषेच्या व्यवस्थेने दाखवली नाही. त्यांना दंतकथांचा किंवा लोकसाहित्याचा वेगळा दर्जा दिला गेला याकडे भुजंग मेश्राम आपले लक्ष वेधून घेतात. अगदी अलीकडच्या काळातील संदर्भ देताना देशातील भाषानिहाय राज्यव्यवस्थेच्या स्थापनेच्या घटनेचा ते उल्लेख करतात. या भाषानिहाय प्रांतरचनेत कुठल्याही आदिवासी भाषेला मग ती गोंडी असो, संथाली असो, कुडुख असो किंवा मुंडारी असो, स्थान मिळाले नाही. राज्यरचनेत तर सोडाच, जिल्हारचनेतदेखील आजही आदिवासी भाषांचा विचार केला जात नाही. त्यामुळे ज्या भागात आदिवासी लोक बहुसंख्येने राहात होते तो भाग वेगवेगळया राज्यांमधे वाटला गेला आणि परिणामत: आदिवासी त्या त्या राज्यात अल्पसंख्य झाले. याचे अधिक विश्लेषण करताना भुजंग मेश्राम म्हणतात की आदिवासींमधील टोळीजीवन, संचयवृत्तीचा अभाव, एकत्र येऊन राहण्यापेक्षा गटागटाने राहण्याची वृत्ती, वेगवेगळया बोलीभाषा आणि त्यात एकमेकांच्या बोलीभाषेत आदानप्रदान नाही अशा कारणांमुळे आदिवासींचा आवाज क्षीण राहिला.

समकालीन आदिवासी साहित्याची मीमांसा करताना त्यांनी आदिवासी साहित्याला मर्यादा पाडणाऱ्या गोष्टींचे कुंपण स्पष्टपणे दाखवले आहे. सोबतच ते ओलांडून जाण्यासाठी आदिवासी लेखकाने काय करावे याचे दिग्दर्शनही केले आहे. बोलीभाषेतील शिक्षणाचा अभाव या महत्त्वाच्या मुद्दयावर त्यांनी बोट ठेवले आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम आदिवासी समाजाच्या आणि आदिवासी संस्कृतीच्या अस्तित्वाला कसे नख लावत आहेत हे देखील स्पष्ट केले आहे.
.....

आदिवासी साहित्य आणि दलित साहित्य यातील अनुबंधाची स्पष्ट कल्पना भुजंग मेश्राम यांना होती. अत्यंत कृतज्ञपणे ते लिहितात, 'आदिवासी लेखकांसमोर प्रेरणेचे निमित्त म्हणून दलित लेखक डोळयासमोर होते. त्यामुळे आदिवासी लेखक लिहू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील शाक्तिंस्थळांमुळे आदिवासी साहित्याला दिशादिग्दर्शन मिळाल्याने आदिवासी साहित्याची मूलभूत प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.' सोबतच आदिवासी साहित्याच्या पृथकपणाची गरजही ते पोटतिडकीने मांडत असल्याचे दिसून येते. 'दलित या व्यापक अर्थी सर्वहारा समाजाला समानार्थी म्हणून वापरल्या जाणाऱ्या दलित जीवनाचा एक भाग आदिवासी समाजाचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु आदिवासी सामाजिक जीवनातील सांस्कृतिक वैशिष्टयांचे पदर वेगळे आहेत. दलित व आदिवासी साहित्याचे उद्दिष्ट एक असले तरीही दलित साहित्याचा प्रदेश व्यापक करण्याच्या दृष्टीने आदिवासी साहित्याचा प्रारंभ आवश्यक ठरतो,' असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
....

आदिवासी साहित्याबद्दल व्यापक आणि सर्वसमावेशक विचार करून भुजंग मेश्राम थांबत नाहीत, तर ते त्यांच्या मातृभाषेबद्दलचा, 'गोंडी'बद्दलचा आपला सूक्ष्म भाषाविचारही त्यांच्या या ग्रंथातील संशोधनपर निबंधांमधून मांडतात. जगातील काही आदिवासी समूहांचा अभ्यास समाजशास्त्रासारख्या विषयात झालेला दिसून येतो. गोंडी संस्कृतीची मुळे शोधण्यासाठी त्यामुळेच भुजंग मेश्राम गोंडी भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, लोकगीते याकडे वळतात आणि त्यातून सांस्कृतिक संदर्भ शोधून गोंडी लोकजीवनाचा शोध घेतात. गोंडांच्या धार्मिक जीवनाशी संबंधित म्हणींमधून त्यांना गोंडांच्या देवदेवतांबाबतच्या कल्पना दिसतात, नीतिमूल्यांबाबत, कष्टाळूपणाबाबत, प्रामाणिक राहण्याबाबत, शारीरपणाबाबत अनेक विचार म्हणींमधून व वाक्प्रचारांमधून शोधून ते गोंडांच्या जीवनमूल्यांना अधोरेखित करतात. लोककथा, पुराणे, कहाण्या, गीते, दंतकथा या साऱ्यांमधून प्रत्यक्ष लोकजीवनातले संदर्भ देत भुजंग मेश्राम आपल्यापुढे गोंडी संस्कृतीचे पदर त्यांच्या बारकाव्यांसकट उलगडून दाखवतात.

आदिवासी समाजाच्या दु:स्थितीचे वर्णन करणारे भुजंग मेश्राम त्यातल्याच एका समूहाचे सूक्ष्म निरीक्षण त्यातल्या गोडव्यासह, जगण्यातील निर्मळपणासह, नीतिकल्पनांसह, अद्भुतरम्यतेसह, अस्मिताभानासह अत्यंत संवेदनशीलतेने मांडतात. गोंडांबाबतचे समाजशास्त्रीय संशोधनदेखील केवळ त्यांचे राहणीमान, वेशभूषा, नृत्ये इत्यादींबाबत वरपांगी झालेले असून खोलवरच्या अभ्यासासाठी गोंडी गोत्रनामांचा, स्थळनामांचा, लोकगीतांचा, भाषेचा अभ्यास होणे गरजेचे आहे व त्यातूनच अद्याप न दिसलेला इतिहास दृष्टिपथात येईल असे मत ते अनुभवांती मांडतात. गोंडी भाषेची स्वत:ची व्यवस्था आहे, व्याकरण आहे, साहित्य आहे, त्याचसोबत प्रभावक्षेत्रही आहे. गोंडीचा वऱ्हाडी या तुलनेने मोठया बोलीभाषेवर काय प्रभाव झाला याचा अभ्यासपूर्ण आलेखच त्यांनी त्यांच्या एका निबंधात मांडलेला आहे. बोलीभाषेच्या तौलनिक साहित्याभ्यासाचा उत्तम नमुना म्हणून या लेखाकडे गांभीर्याने पाहिले जायला हवे. अनेक गोंडी शब्द वऱ्हाडीत जसेच्या तसे आलेले आहेत. काही शब्दांची रूपे वऱ्हाडीत आल्यावर थोडीफार बदललेली दिसतात. व्याकरणाच्या अंगानेही ते गोंडीचा वऱ्हाडीवरील प्रभाव तपासून बघतात. अनेक वऱ्हाडी शब्दांची व्युत्पत्ती गोंडीत दिसून येते हेदेखील त्यांनी सप्रमाण मांडले आहे. त्याहीपलीकडे जाऊन परधानी ही बोली गोंडी व वऱ्हाडीचे अपत्य आहे असे विधान करून त्यावरील स्वतंत्र लेखाचे सूतोवाच त्यांनी करून ठेवले आहे. गोंडी भाषेबद्दलच्या लेखांचा हा विभाग आदिवासी साहित्याच्या अभ्यासकांकरिता वस्तुपाठ तर आहेच शिवाय तो आदिवासी समाजजीवनाच्या भाषाशास्त्रीय व मानववंशशास्त्रीय अभ्यासकांनाही वैचारिक दिशा देणारा आहे.
...........

भुजंग मेश्राम यांच्या प्रस्तुत ग्रंथातून त्यांचा आदिवासी अस्मिताविषयक आग्रह प्रकर्षाने दिसून येतो. मात्र कुठेही त्यांनी भावनिक आवाहन केलेले नाही हे या आग्रहाचे अनन्यत्व आहे. त्यांनी वैचारिक मांडणी करून वैचारिक आवाहन केले आहे. आदिवासी ही मानवी समाजाच्या स्थित्यंतराच्या साखळीतील एक अवस्था आहे. यातून बाहेर यायचे आहे, मात्र सामाजिक परिवर्तन घडत असताना सांस्कृतिक संचित गमावायचे नाही. आदिवासी समाजात होत असलेल्या स्थित्यंतराबाबत ते कुठेही गतकातर होत नाहीत. स्वत: जन्माने आदिवासी समाजातून आल्याने सामाजिक परिवर्तनाची गरज लक्षात घेऊन ते परिवर्तनवादी भूमिका घेतात.

आदिवासी भाषा बोलणारा समाज जर आपल्या अस्मितेसह जिवंत राहिला तर त्याची भाषा जिवंत राहील आणि त्याची संस्कृती टिकेल याची पूर्ण कल्पना ठेवून भुजंग मेश्राम आपला भाषाविषयक अभ्यास आपल्यापुढे मांडतात. भारतीय समाजाची सांस्कृतिक वीण बहुभाषिकत्वाच्या धाग्यांनी बनलेली आहे. या भाषा पृथक असल्या तरीही त्या एकमेकांशी घट्ट विणल्या गेलेल्या आहेत. यातील धागे जर नाहीसे व्हायला लागले तर ही वीण विसविशीत होऊन, निर्माण होण्याकरता शतकानुशतके लागलेले हे वस्त्र फाटायला वेळ लागणार नाही. हे लक्षात घेतल्यास भुजंग मेश्राम यांच्या विचारांच्या मांडणीची सयुक्तिकता आपल्या लक्षात येते. नवे भाषाभान आणि नवे समाजभान देणारे भुजंग मेश्राम यांचे हे लेखन अभ्यासकांसोबतच सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य वाचकांच्या जाणिवा समृध्द करणारे आहे.

Saturday, 29 November 2014

वारस एकलव्याचा मी

वारस एकलव्याचा मी...
by राजू ठोकळ

मूलनिवासी गडी रांगडा
सातपुड्याचे गुणगान मी
तापी नर्मदा भीलवाडचा
वारस एकलव्याचा मी...

दंडकारण्याच्या वैभवातील
शबरीचा बटवा मी
शबर, किरात, निषाद सांगे
वारस एकलव्याचा मी...

तपकिरी वर्ण, जबड़ा हसरा
मानवतेचा गोल चेहरा मी
पीळदार शरीर हरणासंगे
वारस एकलव्याचा मी...

साडी चोळी आखुड पदर डोई
भिलाट्यान्चा शृंगार मी
लाकडाची मोळी बोले
वारस एकलव्याचा मी...

मावची, गामीत, गावितांचे
शेतीभोवतालचे गाव मी
बरडे भिल्ल जागल्यांचा
वारस एकलव्याचा मी...

पाडवींच्या वास्तव्याचा
सदाबहार पहाड़ मी
वळवींच्या आदिम कलांचा
वारस एकलव्याचा मी...

वसाहती गावच्या भावनांचा
वसावा, तडवी मी
गावकुसाच्या माय-बापाचा
वारस एकलव्याचा मी...

निष्णांत तीरंदाजीची
बळीराजाची जमात मी
ब्रिटिशांनी कलंकित केलेला
वारस एकलव्याचा मी...

झाडपाला कंदमुळान्चे गुण
मासेमारीत निपुण मी
निशाणा तीर कामठ्याचा
वारस एकलव्याचा मी...

महुआच्या तेलाचा ठेवा
फळान्ची बेगमी मी
गोड मधाचा रानमेवा
वारस एकलव्याचा मी...

पाच महिण्याच्या गर्भपाताचा
गुन्ह्याच्या शिक्षेचा रीवाज मी
सुईणीचे मात्रुतुल्य बाळन्तपण
वारस एकलव्याचा मी...

यहामोगीच्या श्रध्येचा
निसर्ग अविष्कार मी
हिवारीयाच्या आशीर्वादाचा
वारस एकलव्याचा मी...

आदिवासी लेकरांचा
ज्ञानभांडार मी
विज्ञान युगातील पाखरांचा
वारस एकलव्याचा मी...

बाणावरती खोचलेल्या प्रेमाची
सर्वांगसुंदर कविता मी
आदिवासी नृत्याविष्कारांचा
वारस एकलव्याचा मी...

तंट्या मामाच्या यल्गाराची
क्रांतीची ज्वाला मी
आदिवासी उलगुलानाचा
वारस एकलव्याचा मी...

आदिम अस्तित्व जपणारा
भिल्लवीर शिल्पत राजा मी
माती माझी राखणार
वारस एकलव्याचा मी...

धर्मांध नीच द्रोणाचे
उड़वणार शीर मी
घुसखोर आर्य गाडणार
वारस एकलव्याचा मी...

वाडी वस्ती पाड्यातील
आंदोलनाची धार मी
तलवार तळपती लेखणी
वारस एकलव्याचा मी...

रंजल्या गांजल्या पीडितांचा
विद्रोही आदिवासी मी
समता न्याय बंधुत्ववादी
वारस एकलव्याचा मी...

©www.rajuthokal.com
®www.jago.adiyuva.in

Monday, 24 November 2014

माझा आदिवासी रंग

माझा आदिवासी रंग
by raju thokal

जीवनाच्या प्रवासात
क्षणभर मी थांबलो
विचारांशी थोड़ा भांडलो...
घटकाभर ती भयाण शांतता
विश्वासासोबत चालली
चालण्याच्या या मार्गात
पण का कुणास ठावुक
मनात शंकेची पाल चुकचुकली
दबक्या पावलांच्या पाठलागाची
स्पंदनं मी अनुभवली
अगदी सहज वळुन मी बघितले
या माझ्या नेत्र नयनांनी
हेरले मी अचूक त्याला
सजला होता नक्षत्रांनी
यातच होता मातीचा सुगंध
यातच होती माझी ओळख
यात दिसला माझा ध्यास
माझ्या जगण्याचा श्वास
"माझा  आदिवासी रंग"

©www.rajuthokal.com

राजू ठोकळ

AYUSH! Adivasi Yuva Shakti

www.jago.adiyuva.in

माझीया गावात...

माझीया गावात
by Raju Thokal

माझीया गावात
होती प्रकृती नांदत
माझीया घरात
होती संस्कृती आनंदात
प्रगतीच्या नादात
हरवले सारे 'मी'पणात

माझीया गावात
होते विचार नांदत
माझीया घरात
होते आचार आनंदात
योजनांच्या नादात
हरवले सारे भ्रष्टाचारात

माझीया गावात
होती माणुसकी नांदत
माझीया घरात
होती आपुलकी आनंदात
संगणकाच्या नादात
हरवले सारे मायाजालात

माझीया गावात
होता निसर्ग नांदत
माझीया घरात
होती तुळस आनंदात
सिमेंटच्या नादात
हरवले सारे बंगल्यात

माझीया गावात
होती कणसरी नांदत
माझीया घरात
होते सणवार आनंदात
प्रदुषणाच्या नादात
हरवले सारे कँलेंडरात

माझीया गावात
होते साहित्य नांदत
माझीया घरात
होते संगीत आनंदात
मोबाईलच्या नादात
हरवले सारे फेसबुकात

माझीया गावात
होती जनता नांदत
माझीया घरात
होती ममता आनंदात
स्पर्धेच्या नादात
हरवले सारे पैशात

माझीया गावात
होते संस्कार नांदत
माझीया घरात
होते शब्दालंकार आनंदात
इंग्रजीच्या नादात
हरवले सारे गुणपत्रकात

माझीया गावात
होत्या परंपरा नांदत
माझीया घरात
होत्या कला आनंदात
कारखानदारीच्या नादात
हरवले सारे शहरात

माझीया गावात
होती फळे-फुले नांदत
माझीया घरात
होती मुले आनंदात
टिव्हीच्या नादात
हरवले सारे कार्टूनात

माझीया गावात
होती ऊब घोंगडीची नांदत
माझीया घरात
होती धांदुक फड़की आनंदात
फँशनच्या नादात
हरवले सारे साडीच्या पदरात

माझीया गावात
होते स्वातंत्र्य नांदत
माझीया घरात
होती क्रांती आनंदात
जातीपातीच्या नादात
हरवले सारे आदिवासी वीर इतिहासात

माझीया गावात
होता मूलनिवासी नांदत
माझीया घरात
होता आदिवासी आनंदात
घटनेच्या नादात
हरवले सारे आरक्षणात

©www.rajuthokal.com

राजू ठोकळ

आयुश!आदिवासी युवा शक्ती

माझ्या कविता

image

Saturday, 22 November 2014

आम्ही आदिवासी

आम्ही आदिवासी
by raju thokal

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
निसर्ग सौंदर्याचे पूजक आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
अथांग सागराच्या लाटा आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
वारली चित्रकलेतील वास्तव आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
कड़ेकपारित जगण्याची धडपड आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
कातळातुन झेपावणारा आत्मविश्वास आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
स्वातंत्र्यासाठी सांडलेले कण कण रक्त आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मुलनिवासी
कनसरीच्या गितातिल सुर आम्ही 

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
वाघ बारसीचे गोपाळ आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मुलनिवासी
मुखवट्यान्च्या नाचाचा बोहडा  आम्ही 

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
रानात बहरलेली स्वच्छंदी फुले आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
 कपाळी माती घामाचे लेकरू आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
पावसाळा झेलणारी घोंगडीची ऊब आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
नशिबाच्या छाताडावर फुललेला संसार आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
भातलावणीचा चिखल आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
बोली भाषेचा अभिमान आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
सर्व संस्कारांचे मुळ आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
ख-या इतिहासाची स्पंदनं आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
या भूमिचे नायक आम्ही

आम्ही आदिवासी
आम्ही मूलनिवासी
या धरतीचे मालक आम्ही

©www.rajuthokal.com

हा आदिवासी बांधव माझा

हा आदिवासी बांधव माझा
by raju thokal

हा आदिवासी बांधव माझा, याची जाण जराशी राहु द्या रे ।।धृ।।

हा उंच डोंगर माझा, हा फुललेला निसर्ग माझा
ही भात शेती, वारली चित्रकला, हा बोहडा माझा
संस्कार यांचे पूजता, कुणी गरिबांशी या नडता
या मरण द्यावया, हा आदिवासी माणुस जागु द्या रे ।।

हा आदिवासी बांधव माझा, याची जाण जराशी राहु द्या रे ।।धृ।।

कातळागत जगणे आज रडले, माय भू च्या रक्षणाला
जपा ते, लागा कामाला, या आदिवासी क्रांती सुर्याला
ही राखेतील चिंगारी, आदिवासी बाणा मन मंदिरी
बिरसाच्या बलिदानाचा अर्थ, आदिवासी मशाली पेटू दया रे ।।

हा आदिवासी बांधव माझा, याची जाण जराशी राहु द्या रे ।।धृ।।

जरी अनेक आपल्या जनजाती, जरी अनेक आपल्या बोली
परी आदिवासी गर्व असू द्या, तेवत ठेवा संस्कृतीची पणती
सांगा जोहार सर्व दूर यल्गार, धर्मरक्षणा उलगुलान
हा आदिवासी समाज, इतिहास अजरामर होवू द्या रे ।।

हा आदिवासी बांधव माझा, याची जाण जराशी राहु द्या रे ।।धृ।।

©www.rajuthokal.com

"माझा आदिवासी हा संस्कृतीचा पाया ते शिरोमणि असा परिपूर्ण आहे. "
  -राजू ठोकळ

मस्त झोपलाय आदिवासी

मस्त झोपलाय आदिवासी...
by Raju Thokal

मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका
संस्कृती जतनाचे विचार इथे फाडफाड बोलू नका
सिमेंटच्या जंगलातील आदिवासी रानात आणू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

ठेकेदार माजलेत, माजू दे
आदिवासी बहिणींवर हात टाकत आहेत, टाकू दे
अंगावरचे पांघरून उगाचच ओढू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

खायला नसले तरी चालेल...योजना खा
समजत नसले तरी बेहतर...पैसे घेवून मतदान करती
योजनांसोबत प्रगतीची उगा स्वप्ने रंगवू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

आश्रमशाळेत नाव पोरगं घरीच....वाईट काय
पीत रहा दिवस आणि...नाईट काय
सारेच धुंद आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

पाणी-पुरवठा योजना नेत्याच्या घरीच.....पाणी पिवूच नका
आरोग्य केंद्र दारी, पण डॉक्टर शहरी....आजारी पडू नका
मरणाचीच वाट पहा उगा आदिवासी जोडू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

प्रगती आमच्या नेत्यांचीच....स्वतासाठी काही मागू नका
आदिवासी खातेच आम्हाला खातंय....दुख मानू नका
कंबराचे सोडून आता डोक्याला बांधू  नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

विकासासाठी आक्रमक आग्रही बनू नका
नाराजीने नक्षलवादाचा मार्ग तुम्ही निवडू नका
एकी आणि नेकीचे बळ आहे उद्विग्न तुम्ही होवू नका
मस्त झोपलाय आदिवासी, झोप त्याची मोडू नका

©www.rajuthokal.com

raajoo thokal

AYUSH । Adivasi Yuva Shakti

बदलवून टाक

बदलवून टाक......

by raju thokal

बदलवून टाक आजचा काळ परीक्षेचा सारा
जागवु इथे आदिवासी घामाच्या अहोरात्र धारा !!
डोंगर द-यांतील कातळाना देऊ
झळाळि आदिवासी विचारांची
पडकईच्या जमिनीत घेऊ
पीके मोत्यासमान तांदळान्ची !
गावापर्यंत योजना नेवू, पिड़ीताला सहारा !!

बदलवून टाक.......

सोनेरी सूर्य आदिवासी क्रांतीचा उगवेल
जेव्हा बोलतील आदिवासी कविता
बिरसा, राघोजी, तंट्या मामा दावी
ज्वाज्ज्वल्य क्रांतिमय बाणा आदिवासिंचा
तथाकथित इतिहासकारांनी केला आदिविचारांचा कचरा !!

बदलवून टाक.......

आदिवासी संपदेवर खिळले डोळे
कावेबाज भांडवलदारांचे
राजकारणीह़ी स्वप्न जपती
आमच्या -हासाचे
चला माय-बापहो समजुन घेवु आज हा इशारा !!

बदलवून टाक......

निसर्ग अविष्काराची कृपा
बळ आम्हास देई
सह्याद्रिची उंच शिखरे
कळसुआईचे नाव घेई
निसर्ग पुजती आम्हीच सारे हाच तो दरारा !!

बदलवून टाक आजचा काळ परीक्षेचा सारा
जागवु इथे आदिवासी घामाच्या अहोरात्र धारा !

©www.rajuthokal.com

आश्रमशाळा

आश्रमशाळा
by Raju Thokal

आश्रमशाळाही आमच्याच...येथील समस्याही आमच्याच....

विद्यार्थीही आमचेच.....पालकही आमचेच.....

चित्र तर आमचेच आहे...पण तक्रारीही आम्हीच करतोय....

शिक्षकही आमचेच.....अध्ययनही आमचेच.....

ज्ञान भांडार आमचेच असताना त्याचा प्रत्यक्ष वापर होत नसल्याने अज्ञानही जपतोय आम्हीच.....

निधीही आमचाच.....अधिकारीही आमचेच....

संघटनाही आमच्याच....आंदोलनेही आमचीच....

सर्वकाही आमचेच आणि सर्व प्रयत्नही आमच्यासाठीच......परंतु यातील समस्याही आमच्याच पाठी कायम पाचवीला का पुजलेल्या आहेत हे प्रश्नही आमचेच.......

देशही आमचाच.....नेतेही आमचेच......

समाजविकासाचा जगनरथ वाहून नेणारेही आमचेच पांढरपोषी नेते पण तरीही आज आम्हाला आमच्या हक्कांसाठी झुंज द्यावी लागत आहे. आजचा आदिवासी उद्याचा आपला कर्दनकाळ ठरू नये म्हणून कि काय आमच्या विकासात आडकाठी आणणारे खिसेभरुही आमचेच.......

निसर्गही आमचाच.....शिवनेरीवरील कोळी चौथराही आमचाच.....

क्रांतिकारी इतिहासाचे द्योतक आमच्याच समाजात तरीही लाचारी करावी लागतेय आम्हालाच
....आमच्या हक्काच्या जमिनींसाठी......

बलात्कार झेलणारेही आम्हीच....बलात्कार पाहणारेही आम्हीच....

अन्यायाची जाणीव होईल इतपत शिक्षण आमच्या आश्रमशाळांनी कसेही का होईना आमच्या ओटीत टाकले....काहींनी त्यातून आपल्या जीवनाचे सोने केले.....तो सोन्याचा मुकुटही आमचाच....पण तरीही आमचे रक्त कितीही अन्याय बघितला तरी का पेटत नाही हा निरागस प्रश्नहि आमचाच.....

धरणातील जमिनी आमच्याच.....त्यामुळे उपाशीपोटी निजतो आम्हीच.....

धरणग्रस्त आज जगण्याच्या स्पर्धेत झालेत एड्सग्रस्त.....याची जाणीवही फक्त आम्हालाच.....त्याच्या मरणासन्न यातनाही फक्त आम्हालाच......

आदिवासी खातेही आमचेच...त्यातील योजनाही आमच्याच....

आदिवासी विकासाच्या नावाखाली या खात्यातील सुटा-बुटातील मंडळी आम्हालाच खातात....तेव्हा जगावे कि मरावे ? हा प्रश्नही पडतो आम्हालाच.....

आमच्याच समस्या.....भांडवल बनताहेत खाणा-यांसाठी यासारखे दुर्दैवही आमचेच.......

'बे'चा पाढा कुठेतरी पूर्ण होतो...आमचा समस्यांचा गाडा मात्र अखंड धावतच असतो....

आता फक्त डोळ्यात आहेत अश्रू.....लेखणीतून मांडतोय दुखाश्रू....बस्स हे पातकही आमच्याच हातून.....आमच्याच हातून......!!!

©www.rajuthokal.com

यल्गार

यल्गार...
by raju thokal

मन माझे सदैव धावते
रानभरारी वा-यागत
कधी या छतावर
तर कधी त्या छाताडावर
विश्वास नसला जरी या जगाला
असा विश्वास जपतोय मनातला...

आयुष्याच्या वाटेवर
काट्या-कुट्यातुन शोधीत आशा
रानावनांतील जीवांसाठी जगणं
अखेरच्या श्वासाचं हेच मागणं
अट्टहास जरी वाटे हा जगाला
असा अट्टहास जपतोय मनातला...

साक्ष ठेवुनी निसर्गाची
प्रेमाचे अंकुर सदा सजवलेत
नकोत आभूषणं शब्दांची
साथ हवीय नवक्रांतीची 
निर्धार वाटे जरी पोरखेळ जगाला
असा निर्धार जपतोय मनातला....

माणसांच्या ह्रदयातील श्रीमंतिला
वस्त्रांचा इथे दुर्मिळ साज
संस्कृतीने नटलेला आहे समाज
नाचतो तारप्याच्या सुर गंधात
हा आदिवासी परका या जगाला
असा आदिवासी जपतोय मनातला....

नसताना कोणताच गुन्हा
खोट्या जबानीचा सपाटा
कायद्याच्या या दरबारात
हरवला मूलनिवासी घटनेच्या पानांत
जरी न्यायाची फिकिर  नसे जगाला
असा न्याय जपतोय मनातला....

पारतंत्र्याच्या काळ्या ढगांखाली
आदिम इतिहास रक्तरंजित गौरवशाली
भडव्यांच्या कलमने पुसला
अभिमान क्रान्तिविरांचा वैभवशाली
जरी या यल्गाराची जाण नसे जगाला
असा यल्गार जपतोय मनातला....

©www.rajuthokal.com

Friday, 21 November 2014

झलकारी बाई जयंती दिवस

२२ नोव्हेंबर
               मित्रहो

विरांगना झलकारीबाई जयंती दिन

     झाशीच्या पळपुट्या राणीऐवजी रणांगणात तिच्या वेशात लढलेली आदीवासी कोरी जमातीत जन्मलेली शुर मुलनिवासी महीला योद्धा...

     लोकगीतांमधे आजवर तिचा गौरवशाली इतिहास आदीवासी बंधुंनी जतन करुन ठेवला नसता तर खोट्या कपोलकल्पीत भाकड कथेला तुम्ही आम्हीही कवटाळून बसलो असतो...

     पण नियतीच्या मनात काही औरच होते...

     लक्षमीबाईला मदतीशिवाय साधे घोड्यावार देखील बसता येत नव्हते, लढणे तर दूरच. तिने किल्ल्याच्या तटावरुन खाली घोड्यावर उडी मारल्याची थाप ब्राम्हणी ईतिहासच मारु शकतो...

     पण ३ महीने इंग्रजांशी किल्ला लढवून प्राणार्पण करणा-या झलकारीबाईचा पराक्रम लिहायला मात्र त्यांच्या हातांना लकवा मारतो. त्यासाठी बहुजनांमध्येच इतिहासकार जन्माला यावा लागतो...

     हा दबलेला आदिवासी इतिहास बाहेर येवूनसुद्धा आज सर्वमान्य नाही. शूर स्त्रीला आजही झलकारीबाईची ऊपमा दिली जात नाही...

    "खुब लडी वो मर्दानी थी
      लक्ष्मी नही झलकारी थी"

     असं म्हणण्याची ही हिम्मत आमच्यात कधी येणार मित्रहो...

जयंती दिनी विरांगना झलकारी बाईंना मानाचा मुजरा.....!!!

"आदिवासींचा इतिहास जगासमोर आणण्याची जबाबदारी आदिवासींची आहे. त्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे."
  -आदिवासी आवाज

image

Tuesday, 18 November 2014

अगुआ बनने की कोशिश मत करना

*अगुआ बनने की कोशिश मत करना *

मुद्दा तुम्हारा,मंच तुम्हारा
और भीड़ भी तुम्हारी ही
लेकिन अगुआ बनने का कभी
मत करना कोशिश तुम अपने समाज का
अगुआ बनने का हक नहीं है तुम्हारा
दोपहर की तपती धूप में
नाचना-गाना होगा तुम्हें
और धोकर पांव हमारा
पहनाना फूलों का हार हमें
यह नियति हैं तुम्हारी
तुम्हें सुनना होगा दर्द अपना
पवित्र मुख से हमारा
और गलत व्यख्यान को भी हमारा
लगाना होगा दिल से तुम्हें
तालियां भी बजाना होगा तुम्हें
भीख मांगकर पैसा बटोरोगे तुम
और मुट्ठीभर चावल भी लाना होगा तुम्हें ही
लेकिन याद रखना
सिर्फ़ तालियों से काम नहीं चलेगा
करना जिंदाबाद भी
यह हक है हमारा
तुम्हारे दुख-दर्द और पीड़ा को
शब्दों में बयान कर
दुनिया में बटोरेंगे यश हम
और बनेंगे मसीहा भी तुम्हारा
बनने की अगुआ समाज का अपने
कल्पना मत करना कभी
बना देंगे तुम्हें हम
अपराधी,भ्रष्टाचारी और देशद्रोही
तुम्हारी भाषा हमें नहीं आती है तो क्या
किताबों में भी तुम्हारा
होगा नाम हमारा ही
पाप की गंगोत्री में डूबकर भी
अगुआ होंगे हम
पवित्र समाज का तुम्हारा
अगुआ बनने की कभी कोशिश मत करना
अगुआ बनने का हक नहीं है तुम्हारा।

-ग्लैंडसन डुंगडुंग जी की कविता

वसुदेव कुटुंबकम या संकल्पनेत आदिवासी धर्म

दिनांक १६ नोव्हेंबर २०१४ पुणे येथील वसुधैव कुटुंबकम तर्फे आयोजित जागतिक शांतता आणि एकात्मता परिषद (विषय - धर्म, मातृभूमी, महिला) मध्ये आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करताना आप. अशोकभाई चौधरी यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे थोडक्यात. कृपया सर्वांनी एकदा वाचुन नक्की विचार करावा.

१) private  ownership (खाजगी मालकी ) :
अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला कि,आदिवासी समाजात खाजगी मालकी ची संकल्पना कधी रुजली नव्हती, म्हणून कधी आदिवासी साम्राज्ये फारशी बनली नाहीत, जी बनली ती स्वरक्षणार्थ बनली. याला कारण असे कि संपत्ती व खाजगी मालकी बनवली, तर तिचे रक्षण, वयक्तिक इर्षा, स्पर्धा,स्वार्थ, मोह,  हिंसा उदयास येते. आदिवासी समाज मात्र या पासून अलिप्त राहून अजुनी सामाजिक एकात्मता, परस्पर सहकार्य, हे जीवन शैलीत सहज येते.

पुढे जावून श्री. अशोकभाई हा मुद्दा आणखी विस्तारत म्हणाले कि,आदिवासींनी संपत्ती स्वतःजवळ साठवून न ठेवता ते समाजात वाटून घेत असत. आणि म्हणून जर संपत्तीच नाही तर गरीब श्रीमंत हा भेदभाव देखील आदिवासींमध्ये रुजला नाही. समानता हा आदिवासी समाजाचा सर्वात मोठा पाया हा याच गोष्टीमुळे ठरतो.

          संपत्ती नाही म्हणून कधी institutions बनली नाहीत. सामाजिक, आर्थिक कोणत्याच प्रकारच्या संस्था विकसित झाल्या नाहीत. व्यापार, व्यवहार, गरजे पेक्षा जास्त जमा करणे याची गरजच कधी आदिवासींना पडली नाही. जे काही व्यवहार व्हायचे ते सर्व एकमेकांवरील विश्वासाच्या आधारावर व्हायचे.

२) self governance system (स्वशासन प्रणाली)
          दुसरा मुद्दा हा खूप महत्वाचा मांडला. अशोकभाई म्हणतात कि, "आदिवासी समाज जरी समूहा समूहाने राहत असला तरी त्यांनी स्वताची self governance system (स्वशासन प्रणाली ) त्यांनी विकसित केली आहे. या प्रणाली अंतर्गत समाजाच्या छोट्या मोठ्या समस्या आपापसात चर्चा व समेट घडवून सोडवल्या जात , त्यांचे स्वतःचे काही नियम व कायदे आहेत,त्यामुळे वेगळ्या एखादया किंवा बाहेरच्या न्यायप्रणालीची आदिवासींना कधी गरज पडली नाही.

३) स्वावलंबन       
          तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला गेला तो म्हणजे स्वावलंबन , हा मुद्दा मांडताना अशोकभाई म्हणतात कि आमच्या मुलांना कधी विज्ञान शिकवायला वा  तंत्रञान  शिकवायला विशेष प्रणालीची आवश्यकता भासली नाही. कारण आमची मुले सामुहिक होवून काम करणारा समाज बघून सामुहीकता,संघटीतपण हे गुण शिकतात. दैनदिन जीवनातून त्यांनी विज्ञान व तंत्रञान शिकलेय.

          आदिवासी समाज हा अत्यंत स्वावलंबी , शिस्तबद्ध आणि स्वतःची एक शाषणपद्धती विकसित करून चालवणारा असा स्वयंभू समाज आहे .

   सर्व समाजाला उद्देशून बोलताना अशोकभाईनी आदिवासी समाजाची तत्वे सोडून जर आपण चालू पडलोय आणि यामुळे आपण स्वताचे नुकसान करून घेतोय सर्व मानवजातीचे नुकसान करतोय असा महत्वाचा इशारा दिला,ते म्हणाले कि आज आपण सर्वजन समाजात विविध तत्वांची मांडणी करतो मात्र वागतोय त्याच्या अगदी विरुद्ध! प्रत्येक जन आज ध्येय पूर्तीच्या मागे लागलाय ,जास्ती मिळवण्याच्या मागे लागलाय आणि जास्ती मिळवण्यासाठी एकमेकांशीच स्पर्धा करू लागलोय स्पर्धेतून द्वेष मत्सर निर्माण होवून मानव जातीमध्ये विष पसरत आहे हे जर टाळायचे असेल तर आदिवासी तत्वे आत्मसात करणे खूप गरजेचे आहे . "मला वाटते कि या जगाचे पुन्हा retribalisation व्हावे असे मला वाटते" असे अशोक भायींनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा एकच गजर झाला.

विज्ञानाचा वापर हा एकमेकांना जोडायला केला गेला पाहिजे न कि एकमेकांना मारायला हे सांगायला ते विसरले नाहीत.  भाषण संपवताना मात्र त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला कि सर्वांना विचार करायला भाग पाडले. इंगजी आणि हिंदीमधून भाषण देताना म्हणाले कि, we all  believe Darvin's principle right?" म्हणजे आपण सर्व जन डार्विन च जीवउत्क्रांतीचा सिद्धांत मानतो त्यावर विश्वास ठेवतोय ना. (सभागृहात  होकारार्थी माना  डोलावल्या गेल्या ) या सिद्धांतात म्हटलेय कि माकड (वानर) हे आपले पूर्वज होते आणि ते आपण अभिमानाने मान्य करतो.  मग आपण हे का मान्य करत नाहीत कि आदिवासी हे आपल्या पूर्वजांचे पण पूर्वज होते .?"( सभागृत टाळ्या वाजू लागल्या मात्र त्याच बरोबर उपस्थित पण विचारात पडले  हे सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते)

सदर चे भाषण बघण्या साठी येथे क्लिक करा : http://youtu.be/HJHFe_vTtaA 

www.jago.adiyuva.in

"माकड हे मानवाचे पूर्वज आहेत हा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिध्दांत सर्वजन मोठ्या अभिमानाने मान्य करतात मग आदिवासी हे येथील मुळ रहिवासी आहेत हे का मान्य केले जात नाही?"
  -अशोकभाई चौधरी

Monday, 17 November 2014

कृषि विकास

कृषी विकास
-राजू ठोकळ

कुठून केव्हा येतील
अच्छे दिन
वाट पाहून रोज
शेतकरी झाला दीन

माझा बाप
एकटा नाही
असंतोषाच्या आगीत
रोज जळते लोकशाही

दुबळ्या विकासाच्या गप्पांत
काळीज माझं फाटतं
शेतीमालाच्या संकटांत
नशीब मेलं फुटकं

गरीबी-जुलुमाचे
राजकारण कळु लागले
मान-सन्मानाचे
बळीचं राज्य जळु लागले

झेंडे आणि तोंडं
सत्तेत सारेच बदलले
विकासाच्या अजेंड्यात
शेतक-याला मात्र विसरले

आत्महत्त्येच्या विचाराने
हैराण सारी माती
लाखो हातांच्या एल्गाराची
कुठे हरवली नीति?

निसर्गाच्या लहरीपणागत
सरकारी योजनांचा खेळ सारा
माय-बापाच्या अस्तित्वासाठी
चला देवू कृषि विकासाचा नारा

©www.rajuthokal.com

"शेतकरी जगला तर देश टिकेल"

राजू ठोकळ

facebook

हा उजेड आदिवासी मनातला

उजेड आदिवासी मनातला...
-राजू ठोकळ

नदी    नाल्यांच्या    प्रवाहात
खेकड़ी दगडाखाली शोधताना
अनेकदा अडकली बोटे
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

करवंदाच्या जाळीमधली
काळी मैना तोड़ताना
अनेकदा रुतले काटे
तरी मज वाटे हवा हवा
हां उजेड आदिवासी मनातला

गुडघे गुडघे चिखलात
भात लावणी करताना
अनेकदा झोडपले पावसाने
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

कौलारू पहाड़ी घरात
कुडाच्या भिंती सारवताना
अनेकदा शेणही गेले तोंडात
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

सोन-पिवळ्या शेतात
पिकांची कापणी करताना
अनेकदा रक्ताळली बोटे
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

वडिलांच्या कोपरीच्या खिशात
घामाची दमड़ी शोधताना
अनेकदा रीते झाले हात
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

घराच्या हक्काच्या अंगणात
रात्री चांदण्या मोजताना
अनेकदा स्वप्नांची सोडली साथ
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

दुनियेचा महासागरात
भविष्याची स्वप्ने रंगवताना
अनेक खाल्ल्या ठेचा
तरी मज वाटे हवा हवा
हा उजेड आदिवासी मनातला

©www.rajuthokal.com

राजू ठोकळ

गाँव चले हम

गाँव चले हम...

नाकाम तो वैसे
हम थे ही नहीं
लेकिन मुकाम
मानो दूर है कहीं

शिक्षा से होगा
असरदार कुछ तो
लेकिन कक्षाए खाली
बच्चे खदान में है कहीं

मिट्टी का दामन
वैसे हम छोड़ते नहीं
लेकिन इंसान की हालत
रुला ना दे कही

मेरे गाँव की ममता
शहरों में दिखती नहीं
बंद दरवाजे बंगलो के
इंसानियत मजबूर है कहीं

मिठास में जिए हरपल
दुःख की गुंजाइश नही
गाँव चले है हम
शायद जिंदगी मिलेगी वही

-राजू ठोकळ
©www.rajuthokal.com

राजू ठोकळ

मशाल

मशाल

माणसाची कातडी पांघरुन
श्वापदे गावाकडे येवू लागली
विकासाच्या शहरी बातांनी
माय माझी खरेदी करू लागली

ही उन सावलीच्या खेळातली
माणसे रानफुले साधी भोळी
निसर्गाच्या  अविष्कारातली
कष्टाची रुचकर यांची पोळी

नवरत्नांच्या खाणीतली
सोनपिवळी यांची शेती
जपावी साता जन्मातली
अशी यांची पवित्र नाती

संस्कारांच्या मैफिलीतली
सुरमयी पहाट हरवली
प्रगतीच्या वाटेवरली
श्वापदे गावी अवतरली

दगडखाणीवरल्या यंत्रातली
विषारी नीति स्वर्गात पसरली
मोरपिसांच्या रंगातली
जादू पैशासाठी नासवली

सुखाच्या फुलांची बरसात
कूटनितिने बरबाद केली
मी त्या विळख्यात आज
शोधी नाती अंगणातली

जीवनाच्या वाटेवरली
शपथ मी आज घेतली
श्वास माझा या नभातला
जागवेल माणूस मातितला

सदाफुलीगत हसणारी शेती
तीचाच आज मी सांगाती
ऋण तीचे फेडण्या
आदिवासी मशाल हाती

-राजू ठोकळ
www.rajuthokal.com

"आपण आपल्या समाजाची मशाल होण्याची गरज आहे.....कारण नेते अनेक झाले पण फरक काही पडला नाही."

बिरसा मुंडा

मी अभिमान बिरसा

मी विचार बिरसा
चालविन आदिवासी वारसा

मी आचार बिरसा
जपेल टंट्या मामाचा वारसा

मी कार्य बिरसा
सांगेल राघोजीचा वारसा

मी तीर कमान बिरसा
नमितो झलकारीबाईचा वारसा

मी मशाल बिरसा
तेवत ठेविल एकलव्याचा वारसा

मी संगीत बिरसा
नाचेल तारप्याचा वारसा

मी नाद बिरसा
राखितो खाज्या नाईकाचा वारसा

मी अभिमान बिरसा
वंदितो आदिवासी माणसा

©www.rajuthokal.com
www.jago.adiyuva.in

तूच..रे तूच मर्द बिरसा

शेतमजुराचा वसा
स्वातंत्र्याचा प्यासा
आदिवासींचा वारसा
तूच..रे तूच मर्द बिरसा

प्रश्न आदिम अस्तित्वाचा
काळ इंग्रजी राजवटीचा
बिहारच्या दुष्काळातील सेवेला
तूच..रे तूच मर्द बिरसा

हवालदिल रान वारा
दुष्काळात  शेतसारा
माफ करण्या सरसावला
तूच..रे तूच मर्द बिरसा

जहागीरदारांची मनमानी
जमिनदारांची पापी वाणी
या शोषणाविरुध्द लढ़ला
तूच..रे तूच मर्द बिरसा

-©www.rajuthokal.com

धागा आदिवासी मनातला

मीच आहे निसर्ग
झोपड़ीतला स्वर्ग
सोबतीला भूमी
विश्वासाची हमी

इतिहासाची ठेवा साक्ष
वर्तमानात आम्ही दक्ष
भविष्याशी संवाद अमुचा
श्वास  राखला संस्कृतीचा

लढा यंत्र युगाशी
कष्ट करुनी उपाशी
यंत्रागत माझ्या
शरीरात रक्त नाही

परीवर्तनाचा फास
हरवला माझा घास
माहितीच्या युगातला
मी असा क्षितिजावरला

विकारग्रस्त शहरात
संस्कृतीच्या आजारात
उपेक्षित विकासातला
धागा आदिवासी मनातला

©www.rajuthokal.com

आदिवासी ईमान

आदिवासी ईमान...

पल पल की जिंदगी
अंधेरा चारो ओर है
सूरज सा एहसास
ऐसे विचार आदिवासी है

जंगल तो नाम मानो
वरना जीवन संगीत है
धुन हरवक्त बजती
दुःख की बाते कमजोर है

पंछीयो से सीखो
किताबे आज भी मजबूर है
पेड़ पौधे भगवान जैसे
संस्कृती हमारी किमयागार है

हवाए भी झूमती
वारली के रंगों में चमकती है
धरती माँ की पूजा में
खिलती खेती आदिवासी ईमान है

©www.rajuthokal.com
www.miadivasi.org

सियासत

सियासत के खेल में
क्या मिला क्या पता किसको?
हम चिल्लाते रहे
बंजर जैसी जमींन पे हमारे

हर कोई दिखाता है
अच्छे दिनों के सपने
फिर क्यों हजारो सालो से
लढ़ रहे है अपने

झेंडे बढ़ रहे है
चेहरे पहचानते है हम
सभी तो है अपने
फिर क्यों दोषी समजते है हम

हमारी जिंदगी हो हरियाली
वजूद है हम सब का
क्या कोई दिखा दे
क्या अपराध है हम सब का

आओ चले अब दिखा दे
प्रकृती  साथ है
चलो चले हिला के रख दे
प्रगती के साथ है

राजू ठोकळ
13.10.2014